Maharajanchya Jahagiritun…पुणे जिल्ह्यातील 29 किल्लेAuthor/s:

महाराष्ट्रातला पुणे जिल्हा म्हणजे असंख्य ऐतिहासिक घटना-घडामोडींचा साक्षीदार होय. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना याच जिल्ह्यातून केली, तर यातील राजगडावर त्यांचे २५ वर्षे वास्तव्य होते. सातवाहन राजवटीपासून ते ब्रिटिश राजवटीपर्यंत सगळ्या कालखंडांत पुण्याचा इतिहास आणि भूगोल सातत्याने बदलत गेला. याच स्थित्यंतरांचे केंद्रबिंदू असलेल्या, पुणे जिल्ह्यातील एकूण २९ किल्ल्यांची परिपूर्ण माहिती हे पुस्तक देते. केवळ माहितीवजा इतक्या मर्यादित स्वरूपात न राहता, प्रत्येक किल्ल्याचे वैशिष्ट्य, त्यासंबंधी निगडित इतिहासाचे संदर्भ, नकाशे व भरपूर रंगीत आणि ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्रे या अनुषंगाने हे पुस्तक वाचकांशी जणू संवाद साधते. गडकिल्ले बघू इच्छिणार्‍यांना सर्वांगीणदृष्ट्या उत्तम वाटाड्या ठरेल, असे हे पुस्तक आहे.

Out of stock

Category: Tag: